शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

केंद्र, राज्यातील मतलबी सरकारकडून जनतेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:03 IST

कºहाड : ‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवलं आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलोय, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे हे मतलबी सरकार लवकरच संपेल आणि ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊन काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल,’ असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.कºहाड येथे माजी ...

कºहाड : ‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवलं आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलोय, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे हे मतलबी सरकार लवकरच संपेल आणि ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊन काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल,’ असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.कºहाड येथे माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचा राजकीय, सामाजिक वाटचालीचा सुवर्णमहोत्सव व १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा अमृतमहोत्सव असा संयुक्त कार्यक्रम पार पडला; त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर होते. माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ शेती शास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, विनोद शिरसाठ, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘देश कुठे चाललाय, हे कळत नाही. देशात हुकूमशाही वाढू लागल्याचे चित्र दिसतंय. मी गृहमंत्री असतानाही अनेक गोष्टी केल्या; पण त्याचा कधी गाजावाजा केला नाही. खरंतर गृहमंत्री म्हणून काम करीत असताना अनेक गोष्टी या गोपनीय ठेवाव्या लागतात. आमच्या काळातही मिलीटरी स्ट्राईक झाले होते, पण यांनी त्याला ‘सर्जिकल स्ट्राईक’ असे गोंडस नाव देऊन आम्ही काही तरी वेगळं केलं आहे, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.काँग्रेसचा एकदा नव्हे दोनदा नव्हे, तर तब्बल तीनवेळा पराभव झाला आणि आता काँग्रेस संपली अशा वल्गना सुरू झाल्या. मात्र, काँग्रेस कधी संपली नाही आणि संपणार नाही. काँग्रेसने पुन्हा उभारी घेतली. देशातील आणि राज्यातील सद्य:स्थिती पाहता जनतेमध्ये प्रचंड राग पसरला असून, काँगे्रस पुन्हा एकदा उंच भरारी घेईल.’ईव्हीएम घोटाळ्यावर टीकाआम्ही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर प्रेम करणारी माणसे आहोत. पराभूत झालो म्हणून हटणारे नाही. ज्या इंदिरा गांधींचा लोकांनी पराभव केला त्यांनाच लोकांनी प्रचंड मतांनी निवडून दिल्याचा इतिहास आहे. अन् तेही बटण दाबून नव्हे, असं म्हणत शिंदे यांनी ईव्हीएम मशीन घोटाळ्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर